पुन्हा बरसल्या या जलधारा...
पुन्हा बरसल्या या जलधारा...
डॉ. कलाहल्ली उमेश
यांच्याद्वारे
वॉलथॅम सायंटिफीक कम्युनिकेशन मॅनेजर, मार्स इंडिया.
मान्सुनच्या पहिल्या जलधारा बरसताच जीवाला बैचैन करणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळतो. आपण मान्सूनच्या आगमनाचा आनंद लुटत असतानाच हा ओलसर मोसम आपल्या पाळीव जनावरांसाठी मात्र एक वेगळेच संकट घेउन येत असतो. यामुळे आपल्या घरातील फरची त्वचा असणाऱ्या पाळीव प्राण्यांना मान्सूनच्या दुष्प्रभावापासून वाचवणे आवश्यक ठरते.
मार्स इंडियाचे वॉलथॅम सायंटिफीक कम्युनिकेशन मॅनेजर डॉ. कलाहल्ली उमेश यांच्यामते पाळीव प्राण्यांच्या मालकांनी मान्सूनमध्ये त्यांच्या लाडक्या जीवांवर उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची जाणीव ठेवली पाहिजे. मान्सूनच्या कालावधीत वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पाळीव प्राणी घाबरुन सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे काही पाळीव प्राणी वादळी वाऱ्यांना इतके घाबरतात की ते पुरते हादरुन जातात. त्यांच्या अति घबराटीची लक्षणे म्हणजे थरथर कापणे, स्वत:चे केस उपटण्याचा प्रयत्न करणे, लपण्याचा प्रयत्न करणे, चावण्याचा प्रयत्न करणे किंवा दात एकमेकांवर आपटणे. वादळी वाऱ्याला घाबरुन तुमचा प्राणी सुटून पळून गेला तर तो सुरक्षित परतण्याची एकमेव आशा म्हणजे तुम्ही त्याची ओळख पटवण्यासाठी केलेली आधीची तरतूद. हे टाळण्यासाठी वादळी वाऱ्याच्यावेळी पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यास उपयुक्त ठरणारी अँटी-अँक्झाइटी औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे प्राण्यांना वादळी वाऱ्याच्यावेळी तणाव आणि भितीमुक्त ठेवण्याचे काम करतात.
मान्सूनच्या कालावधीत डास, माशा आणि पिसवासारखे परजीवी पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. त्यामुळे पिसवांच्या चावण्यामुळे उद्भवणारी ऍलर्जी, ताप यांसारखे आजार त्यांना त्रस्त करु शकतात. यासाठी एक जबाबदार मालक म्हणून आपण मान्सूनच्या कालावधीत प्राण्यांवर गोचीड, पिसवा तसेच कीटकनाशक औषधांचा वापर केला पाहिजे.
कुत्र्यांमध्ये पाली, बेडूक आणि कोळी यांसारख्या प्राण्यांचा पाठलाग करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. कुत्री एक तर त्या प्राण्यांना खातात किंवा तोंडात धरुन ठेवतात. या प्राण्यांच्या शरीरात टॉक्सिक घटक असल्यामुळे त्यांचा संसर्ग पाळीव कुत्र्यांना होउन त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. अशा प्रकारे कुत्र्यांना विषारी पाली आणि बेडकांपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी ते बाहेर असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणेच सर्वाधिक महत्वाचे ठरत असते.यासाठी त्यांना बाहेरच्या वातावरणात अधिक वेळ ठेवूच नये.
मान्सून नेहमीच अनेक प्रकारचे संसर्ग घेउन येत असतो. तुम्ही तुमच्या पाळीव जनावरांना चारत असणाऱ्या बिफ, चिकन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसामधून घातक जीवाणूंचा संसर्ग होउ शकतो. यासाठी पाळीव प्राण्यांना चारण्यासाठी तुमच्याकडून खरेदी केले जाणारे मांस स्वच्छतेची काळजी घेतल्या जाणाऱ्या दुकानातून खरेदी केलेले असावे. त्यांना चांगल्या दर्जाचे पेट फूड देणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. (पेडीग्रीसारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड सगळीकडे उपलब्ध आहे.) हे ब्रँड्स तुमच्या पाळीव पाण्यासाठी 100% सुरक्षित मानले जातात. हे पेट फूड्सही हवाबंद कंटेनर्समध्ये ठेवले तरच ते आर्दता किंवा दवामुळे खराब होण्याचा धोका टाळता येतो.
आपण सगळे पाळीव जनावरांवर प्रेम करत असतो. मग त्यांच्यासाठी एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण करण्यासाठी थोडासा प्रयत्न करण्याचीही जबाबदारी आपण पाळली पाहिजे.
Comments
Post a Comment