ग्रामिण भागात विमा जागरुकता करण्यामार्फत एसबीआय जनरल इन्श्युरन्स साजरा करीत आहे “किसान दिवस”

 ग्रामिण भागात विमा जागरुकता करण्यामार्फत 

एसबीआय जनरल इन्श्युरन्स साजरा करीत आहे “किसान दिवस”


 मुंबई,24डिसेंबर 2020: किसान दिवसाच्या प्रसंगी, एसबीआय जनरल इन्श्युरन्सने शेतक-यांसाठी विमा जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते, या उपक्रमामार्फत वित्त समावेशकतेला सक्षम करण्यात आले. राजस्थान, गुजराथ, तामिळनाडू, ओडिसा तसेच देशाच्या इतर भागांमधल्या 50 गावांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

शेतक-यांना क्रॉप विमे आणि नॉन-क्रॉप विमा समाधानांच्या महत्वाची माहिती देण्याचा आणि त्यामार्फत त्यांना नैसर्गिक आपत्तींसाठी सज्ज होण्यास मदत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मागच्या काही ग्रामिण उपक्रमांच्या आधारावर, शेतक-यांना विम्याशी संबंधित माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे, ज्यामुळे ती त्यांच्यासाठी काउंटर-सायक्लिकल किंवा आपत्तींसाठी समाधानाच्या स्वरुपात काम करु शकते याची आम्हाला जाणीव झाली. किसान दिवसाला आपल्या शेतक-यांद्वारे दिल्या जाणा-या योगदानाचे महत्व सांगणारा दिवस मानले जाते. शेतक-यांना शेतीसंबंधित तोट्यांपासून उदभवणा-या जोखमींना कमी करण्याच्या दृष्टीने सबळ बनवण्यासाठी विम्याच्या जागरुकतेबद्दल बोलण्यासाठी या दिवसासारखा दुसरा कोणताही सर्वोत्तम दिवस नाही. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24