जलवाहतूक व जलमार्ग मंत्री, मनसुख मांडविया यांनी आगामी मेरीटाईम इंडिया समिट २०२१ च्या तयारीचा आढावा घेतला
जलवाहतूक व जलमार्ग मंत्री, मनसुख मांडविया यांनी आगामी
मेरीटाईम इंडिया समिट २०२१ च्या तयारीचा आढावा घेतला
जलवाहतूक व जलमार्ग मंत्री, मनसुख मांडविया यांनी आगामी मेरीटाईम इंडिया समिट २०२१ च्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस सर्व भागातील प्रमुखांसह सर्व बंदरांचे प्रमुख उपस्थित होते. ही शिखर परिषद २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान आयोजित केली आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. एमआयएस २०२१ संयोजनात ४०० हून अधिक सामंजस्य करारांवर (एमओयू) वर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. या सामंजस्य करारांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रातील गुंतवणूक, कौशल्य आणि रोजगार आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे सामंजस्य करार जहाजबांधणी प्रक्रिया सुरळीत करण्यास मदत करतील, ज्यामुळे बंदरांमध्ये अधिक व्यापार होऊ शकेल आणि आर्थिक स्थिरता येईल.
Comments
Post a Comment