हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा, १,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन

हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा,
,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन
तामिळनाडू येथील करूर जिल्ह्यातील १२० नारळाच्या झाडांचे हैद्राबाद येथील कान्हा शांती वनम येथे नुकतेच यशस्वीरित्या विस्थापन व पुनर्रोपण केले गेले.
मोठ्या प्रमाणात बदल घडवणारे विविध उपक्रम
• १००० अधिक झाडांचा बचाव व पुनर्रोपण करण्यात आले. यात ८ वर्षे जुनी अव्हेन्यू झाडे, तेलंगणा येथील तुमकुनुता महामार्गावर रस्ते रुंदीकरणाच्या प्रक्रियेतील १५० वर्षे जुनी वडाची १५ झाडे, २५ ते ५० वर्षे जुनी २० पिंपळाची झाडे, कृष्णगिरीतील १२० नारळाची झाडे आणि तितकीच कुरुर जिल्ह्यातील झाडे पुनर्रोपित करण्यात आली.
• ८० टक्के झाडांचे आयुष्य वाचवण्यात आले. 
• येत्या वर्षभरात २ लाख झाडांचा आकडा गाठण्यासाठी १,२०,००० रोपटी व झाडांचे रोपण करण्यात आले. 
• वृक्षांचे वैविध्य कायम राखण्यासाठी ६७५ जातींचे रोपण
• मधमाश्यांचे प्रमाण वाढण्यासाठी १५० मधमाश्यांची पोळी बसवण्यात आली आहेत. 
• जमिनीतील पाण्याचे संवर्धन होण्यासाठी डझनभर कृत्रिम तलावांची अनेक किलोमीटर परिसरात रचना
• या उपक्रमांमुळे, गेल्या १२० वर्षांत प्रथमच २०१०७ मध्ये या दुष्काळग्रस्त परिसरात भरपूर पाऊस पडला.

हैद्राबाद स्थित हार्टफूलनेस इन्स्टिट्यूट (www.heartfulness.orgया संस्थेने आपल्या यशोगाथेत आणखी एक विक्रम रचला असून संस्थेने केवळ एका वर्षभरात १,००० हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन केले आहेया उपक्रमांतर्गततामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यातल्या १५ वर्षांपूर्वीच्या १२० नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आलेनुकत्याच यशस्वी झालेल्या वृक्षांच्या तुकडीत ६० झाडांचा समावेश करण्यात आला असून हैद्राबाद येथील नवीन परिसरात या झाडांची नव्याने लागवड करण्यात हार्टफूलनेस या संस्थेला यश आले आहेकेवळ झाडांचे विस्थापन व पुनर्रोपणच नव्हे,तर त्यांची मशागत करणारा हा आगळावेगळा उपक्रम हाती घेणारी ही पहिलीच संस्था ठरली आहेप्रत्येक वृक्षाच्या अस्तित्वाच्या कालावधीत विशिष्ट असे फायदे दडलेले असतातया वृक्षांचे आयुष्य वाढवून संस्थेने दीर्घकाळासाठी पृथ्वीला हे फायदे करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संस्थेच्या यशाबाबत बोलताना हार्टफूलनेस संस्थेचे चौथे जागतिक मार्गदर्शक कमलेश पटेल ऊर्फ दाजी म्हणाले, “झाडे ही पृथ्वीवरची एकमेव महत्वाची संपत्ती आहेत्यांची भूमिका आणि उपयोग हा मोजण्याच्या आपल्या समजुतीच्याही पलीकडे आहेकेवळ भौतिकदृष्ट्या आपला ग्रह वाचवण्यापलीकडेझाडांमुळे आत्मिक समाधानही जतन होत असून यामुळे मानसिक शांती लाभते आणि विविध पातळ्यांवर आवश्यक असलेले संतुलन साधले जातेम्हणूनचझाडांची संख्या वाढणे अत्यावश्यक असून सध्या अस्तित्वात असलेले वृक्ष नामशेष होण्यापासून वाचवणे सर्वांत महत्वाचे आहेएक झाड आपण वाचवू शकलोतर अशी शेकडो नवीन झाडे लावल्यासारखेच आहे.’’

परिपक्व झाडांचे विस्थापन व पुनर्रोपण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीचीतांत्रिकदृष्ट्या किचकट आणि महागडी आहेविकासाच्या कारणांसाठी बऱ्याचदा झाडांचे विस्थापन केले जात असून त्या झाडांचे आयुष्य सुरक्षित रहावेयासाठी ती अत्यंत काळजीने हाताळणेही आवश्यक असतेझाडापासून ४ ते ५ फूट परिघातली माती खोलवर खणली जाते आणि त्यानंतर झाडांची नाजूक मूळे कापली जातातमगमोठ्या प्रमाणात माती साठवून त्यासकट ही झाडे विस्थापनासाठी संबंधित वाहनात भरण्यात येतात.
वृक्षांभोवती माती धरून ठेवणे अवघड आहेत्यामुळेझाडांभोवतीची माती सुटलेली नाही तसेचमूळे खराब झालेली नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी वाहतूकीदरम्यान अत्यंत काळजी घेतली जातेजिथे त्या वृक्षांचे विस्थापन व पुनर्रोपण करायचे आहेत्या ठिकाणी पोहोचल्यानंतरझाडांना हळुवारपणे मूळ मातीसह मोठ्या तयार खड्डावर ठेवण्यात येतेत्यानंतर सखोल निरीक्षणासहकाळजीपूर्वक रूट प्रमोटर्स आणि जलधारकांसह (हायड्रोजेलखड्डा तयार होईपर्यंत खणले जाते व झाकलेल्या झाडाचे रोपण केले जातेही प्रक्रिया यशस्वी झाल्यास या नव्या जागेत झाड रुजण्यासाठी १ ते २ महिने लागतात.
हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेला ग्रीन कान्हा प्रकल्प म्हणजे सतत विनाशाला तोंड देणाऱ्या झाडांचे संरक्षण करणारा आधुनिक उपक्रम आहेया अंतर्गतअनेक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नव्याने लागवड करण्यात आली आहेसरकारकॉर्पोरेट कंपन्या आणि समाजसेवकांसह एकत्रितपणे कार्य करण्याची योजना संस्थेने आखली असून याबाबत दाजी म्हणतात, “आज आपण ज्या धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहोतती परिस्थिती क्षीण होण्यास केवळ एका सामूहिक प्रयत्नातून मदत होऊ शकतेत्या दृष्टीनेहार्टफुलनेस इन्स्टिट्यूटने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले असून या कार्यात आपल्याला राज्य सरकार,महापालिका आणि व्यक्तीगतरित्या वृक्षांची बचत करण्यासाठी मदत मिळू शकेलअशी आम्हाला आशा आहे.’’
प्रत्येक वर्षीदेशभरात लाखो वृक्षांची कत्तल केली जातेयातून मोठा पर्यावरणीय असमतोल निर्माण होत असून परिणामीआपल्या ग्रहाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेझाडांच्या अंधाधुंद कत्तलीमुळे पर्यावरणाचेसमाजाचेसंस्कृतीचे आणि पृथ्वीच्या सौंदर्याचेही अफाट नुकसान होतेआर्थिक नुकसानही होतेविविध अभ्यासांमधून असे सूचित होते की 
१.      झाडे प्रदुषणास आळा घालतात – ५० वर्षांत एक झाड ३० टन प्रदुषके हवेतून नष्ट करू शकते.
२.      ऊर्जेचे संवर्धन – एका तरुण आणि आरोग्यपूर्ण झाडाचा एकूण कुलिंग इफेक्ट हा २० तास चालणाऱ्या एका खोलीच्या आकारासाठीच्या वातानुकुलित यंत्राइतका असतो.
३.      वन्यजीवफुलपाखरेमाश्या यांना अनुकूलित जंगले पुरवून जीवसृष्टी वाचवण्याचे काम झाडे करीत असून परागणासही मदत होते.
४.      इतकेच नव्हेतर वादळेपूरपाणी साचून राहण्यापासून आपला बचाव झाडांमुळेच होऊ शकतो.
गेल्या तीन वर्षांतसंपूर्ण परिसर स्वयंपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळेहार्टफूलनेस इन्स्टिट्यूटने कान्हा शांती वनमच्या खडकाळकोरड्या व शुष्क जमिनीचे रुपांतर हिरव्या जमिनीत केले आहेसंस्थेच्या अथक प्रयत्नांमुळेया प्रदेशातील वृक्षांची संख्या वाढली आहेतसेचवनस्पतींच्या विविध जातींनाही प्रोत्साहन देण्यात आले असून पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी संस्थेतर्फे कृत्रिम तलावांची निर्मितीही करण्यात आली आहेपरागणाचा वेग वाढण्याच्या दृष्टीने मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठीच्या यंत्रणा बसवण्यात आल्या असून फुलपाखरांसाठी विविधरंगी फुलझाडेही लावण्यात आली आहेतया उपक्रमांमुळेदुष्काळग्रस्त भागात गेल्या १२० वर्षांत प्रथमच चांगला पाऊस झाला व त्याचा लाभ आजुबाजूच्या गावांना मिळालाआता या परिसराचे सौंदर्य डोळ्यांना अधिक सुखावह वाटत असून विविध प्रकारचे पक्षी येथील तलावांमध्ये विहार करतातकान्हा शांती वनम येथील उपक्रमांमुळे येथील गावांमध्ये अनेक आर्थिक घडामोडीही घडत असून हा परिसर हिरवाईने नटला आहे.
हार्टफूलनेसबद्दल...
हार्टफूलनेस ही २० व्या शतकात शोधण्यात आलेली राजयोग ध्यानधारणेची यंत्रणा आहेशतकभरानंतरहार्टफूलनेस या यंत्रणेला जगभरातल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मान्यता दिलीयात समाजसंस्थासरकारी विभागशाळामहाविद्यालये आणि कॉर्पोरेट जगताचाही समावेश होताअधिक माहिती www.heartfulness.org या संकेतस्थळावर मिळू शकते१३० हून अधिक देशांतल्या हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यावर लक्षावधी लोक हार्टफूलनेसचा सराव करतातजगभरातल्या शेकडो हार्टफूलनेस केंद्रांच्या माध्यमातून हा आकडा आणखी वाढत चालला आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24