जागतिक अनिश्चिततेमध्ये तैवान, भारत यांच्या दरम्यान व्यवसायवृद्धीचा प्रयत्न

जागतिक अनिश्चिततेमध्ये तैवान, भारत यांच्या दरम्यान व्यवसायवृद्धीचा प्रयत्न
मुंबई , १९ फेब्रुवारी २०२०:जगात आरोग्यसेवेशी संबंधित समस्या उभ्या राहिलेल्या असल्यामुळे थोडीशी सुधारणा दिसत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला हा एक मोठा धक्का असू शकतो. साथीच्या आजारमुळे अनेक देशांमध्ये व्यवसायांना खूप मोठा झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चीन- ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि जागतिक आर्थिक वाढीचे इंजिन आहे. हा देश सध्या जवळपास थांबला असून त्याचे जगभरात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक पुरवठा साखळ्यावंर अनेक प्रकारे फटका बसण्याची शक्यता आहे. डून अँड ब्रॅडस्ट्रीट या विश्लेषणात्मक कंपनीच्या मते जगभरातील किमान ५१,००० कंपन्या ज्यात १६३ फॉर्च्यून १,००० कंपन्या आहेत त्यांना चीनच्या ह्युबेई प्रांतातून थेट मालाचा पुरवठा होतो. किमान पाच दशलक्ष कंपन्यांना या रोगाच्या उद्रेकाच्या केंद्रबिंदूच्या परिसरात द्वितीय श्रेणीचे एक किंवा अधिक पुरवठादार आहेत.
भारतासाठीही व्यवसायातील अडथळे हळूहळू जाणवू लागतील. चीन हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. २०१८-१९ मध्ये भारतातील १३.७ टक्के आयात या देशातून झाली तर भारताच्या एकूण निर्यातीच्या ५.१ टक्के निर्यात येथे गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीवरून दिसते. भारतीय फार्मा उद्योग एपीआयसोबत औषधे तयार करण्यासाठी (अॅक्टिव्ह फार्मा साहित्य) चीनमधून येणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची ३० अब्ज डॉलरच्या देशांतर्गत स्मार्टफोन बाजारपेठेतही मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात कारण ती चीनमधून येते.
स्मार्टफोन्स, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इवाणिज्य विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत मशिनरीच्या आयातीसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यात भारताच्या आयातीच्या बाजारपेठेत २८ टक्के भाग घेतात आणि संभाव्य शटडाऊनमुळे त्यांच्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो.
परंतु या परिस्थितीवरही मात होऊ शकते.
या वेळी तैवानसारखे देश स्मार्ट उपकरणांमध्ये त्यांची कार्यक्षमता, शाश्वतता, सहजसाध्यता आणि परवडण्याची क्षमता यांच्यामुळे खूप आघाडीवर असल्यामुळे त्यांचा या जागतिक पातळीवरील संकटात मदत, सहकार्य आणि फायदा होऊ शकतो. तैवानकडून भारताला विविध क्षेत्रांमध्ये मदत होऊ शकते. त्यात ऑटो साहित्य आणि भाग, रसायने, अभियांत्रिकी, आर्थिक सेवा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. स्मार्ट सोल्यूशन्स, हार्डवेअर उत्पादन, बांधकाम, साधनसुविधा, खाण संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाइल्स, अन्न प्रक्रिया तसेच इतरच क्षेत्रात त्यांचे ज्ञान लक्षात घेता तैवान भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया''डिजिटल इंडिया' आणि 'स्किल इंडिया' उपक्रमांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि पुढेही बजावेल.
भारत आणि तैवानने जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अशाश्वतीमध्ये व्यवसायाचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे.
तैवान भारतासोबतही हवेचे दर्जा व्यवस्थापन, शेती, शिक्षण, संस्कृती आणि पर्यटन सहकार्य वाढवू शकतो. त्यांनी हे भूतकाळात विविध एक्स्पो आणि कार्यक्रमांमध्ये केलेले आहे. अमेरिकेतील सीएनएननेही तैवानच्या आरोग्य सेवा यंत्रणेबाबत विशेष चर्चासत्रे आयोजित केली आहेत, कारण ती जगात सर्वोच्च दर्जाची आहेत. तैवानकडून औद्योगिक सुधारणा आणि फॅक्टरी ऑप्टिमायझेशनमध्ये आपल्या स्मार्ट मशिनरी उद्योगाद्वारे सहकार्य मिळू शकते. त्यात त्यांची शक्तिशाली आयसीटी उद्योग साखळी आणि प्रिसिजन मशीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. तैवानच्या एकूणच स्मार्ट उत्पादन उपाययोजनांमुळे या जागतिक औद्योगिक सुधारणेच्या टप्प्यात ही एक सर्वोत्तम निवड ठरू शकते.
तसेच, तैवान आता भारतीय कंपन्यांसोबत सहकार्य करण्यासाठी अधिक उत्सुक आहे. त्यात आत्ताच्या परिस्थितीसारख्या काळात सामायिक फायदे आणू शकतात. भारत आणि तैवान यांच्यामधील सध्याचे व्यापाराचे आकारमान ७.५ अब्ज डॉलर्स आहे. या दोन्ही देशांमधील आपसातील व्यापार वाढला आहे. २००० मध्ये १ अब्ज अमेरिकन डॉलरचा हा व्यापार आता २०१९ मध्ये ७.५ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत गेला असून ही आकारमानातील सहा पट वाढ आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक तैवानी कंपन्या आहेत. अलीकडच्या काळात भारतीय आणि तैवानी कंपन्यांमध्ये अनेक एमओयू करण्यात आले आहेत. सध्याचे वातावरण हे तैवानसाठी भारतासोबत व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी उपयुक्त असून जागतिक आरोग्य संकटामुळे व्यवसायात आलेली घट भरून काढण्यासाठी सहकार्य आणि मदतही मिळणार आहे.
या कालावधीत भारतासोबत काम करण्याबाबत तैवानच्या भूमिकेबद्दल बोलताना TAITRAच्या स्ट्रॅटेजिक मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक मार्क वू म्हणाले की, अशा कालावधीत जिथे जागतिक अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे, तिथे तैवान आपले ज्ञान आणि उत्पादकता भारताला देण्यासाठी सज्ज आहे. तैवान भारत ज्या क्षेत्रात प्राधान्य देत आहे अशा क्षेत्रांमध्ये सहभागासाठी अधिक संधी देऊ शकते आणि मूल्यवर्धन करू शकते. त्यात तंत्रज्ञान आणि आयसीटी, आरोग्यसेवा, शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांचा समावेश आहे. भारताला चीनवर खूपच अवलंबित्व असलेल्या क्षेत्रातही वाढीव सहकार्य मिळू शकते. भारत आणि तैवानने या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आपले संबंध विकसित करून संस्थात्मक केले पाहिजेत, जेणेकरून दोन्ही देशांना व्यावसायिक प्रयत्नांत यश आणि शाश्वतता मिळेल.

Comments

  1. As claimed by Stanford Medical, It's really the one and ONLY reason this country's women live 10 years more and weigh an average of 42 pounds lighter than us.

    (And actually, it is not about genetics or some secret-exercise and EVERYTHING around "how" they are eating.)

    P.S, What I said is "HOW", and not "what"...

    Click this link to reveal if this short test can help you discover your real weight loss possibility

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24