स्वातंत्र्यदिनी जगाला दिसणार तिरंग्याची मोहिनी
स्वातंत्र्यदिनी जगाला दिसणार तिरंग्याची मोहिनी
१४ ऑगस्ट, २०२१: मुंबई, यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जगाला तिरंग्याची मोहिनी दिसेल. कारण या निमित्ताने जगातील अनेक देशांच्या अनेक प्रतिष्ठित इमारती आणि पर्यटन स्थळे तिरंग्यात प्रदिप्त केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवल्याप्रमाणे, भारतीय परराष्ट्र मंत्रालय यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मंत्रालयाने जगातील अनेक देशांमध्ये प्रतिष्ठित इमारती आणि पर्यटन स्थळे निवडली आहेत आणि या कार्यक्रमासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे, जी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा' चा एक भाग म्हणून आयोजित केली जाईल.
मंत्रालयाच्या निर्देशानुसार जगभरातील भारतीय दूतावासांनी स्वातंत्र्याच्या या उत्सवासाठी सर्व तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देश ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. यूएसए, यूके, दुबईसह अनेक प्रमुख देशांतील ७५ प्रतिष्ठित इमारती आणि पर्यटन स्थळे १५ ऑगस्टच्या संध्याकाळपासून १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत भारतीय तिरंग्याच्या प्रकाशात चमकताना दिसतील. इतकेच नव्हे तर कॅनडातील जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याच्या लाटाही तिरंग्यात आंघोळ करताना दिशेल. मुख्य इमारती ज्या तिरंग्या दिव्यांनी उजळल्या जातील त्यामध्ये जिनेव्हा मधील संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, अमेरिका मधील एम्पायर स्टेट बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, रशियाचा इव्होल्यूशन टॉवर, अबू धाबी, युएई मधील प्रसिद्ध एडीएनओसी ग्रुप टॉवर, आणि युनायटेड किंगडममधील बर्मिंघमची प्रसिद्ध ग्रंथालय इमारत यांचा समावेश आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने अनामिकत्वाच्या अटीवर सांगितले की, "आझादी का अमृत महोत्सव ही लोकसहभागाची मोहीम आहे. त्याचा उद्देश अभिमानाचे ते क्षण लक्षात ठेवणे आहे, जे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी निगडित आहेत. त्याच्या प्रक्षेपणासह, मोठ्या संख्येने परदेशात राहणारे भारतीय पूर्ण उत्साहाने यात सामील होत आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मार्च २०२१ रोजी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' मोहिम सुरू केली. ही ती तारीख आहे ज्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये दांडी यात्रा सुरू केली होती. १२ मार्च, २०२१ पासून सुरू झालेली मोहीम १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत चालू राहील.
Comments
Post a Comment