Posts

औद्योगिक वापर पाणी दरवाढ उद्योगास मारक - संतोष मंडलेचा

औद्योगिक  वापर पाणी दरवाढ उद्योगास मारक - संतोष मंडलेचा ( अध्यक्ष , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर ) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश क्रमांक 1/2018 नुसार औद्योगिक वापर पाणी दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उद्योगांना न परवडणारे होतील व ते उद्योगास मारक ठरतील त्यामुळे याबाबत शासनाने त्वरीत लक्ष द्यावे अशी  मागणी ना. उद्योगमंत्री श्री. सुभाषजी देसाई यांच्याकडे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरने पत्राद्वारे केली आहे. औद्योगिक विकासासाठी परवडेल अशा दरामध्ये पाणी आणि वीज मिळणे महत्वाचे असते. महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक वापराच्या वीजेचे दर सर्वाधिक आहेत. आता पाण्याचे दरही न परवडणारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश क्रमांक 1/2018 हा आहे. सदरहू प्राधिकरण पाण्याच्या घाऊक वापराचे दर प्रत्येकी तीन वर्षांसाठी निश्चित करत असते. नुकतेच या प्राधिकरणाने असे दर निश्चित केले असून ते 1 फेब्रुवारी 2018 पासून लागू झाले आहेत. सर्वसाधारणरित्या पाण्या...

व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या `मेक इन इंडिया` मोहिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या `मेक इन इंडिया` मोहिमेवर  पुन्हा एकदा शिक्कामोर्तब मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ दरम्यान भारतातील व्यापारव्याप्तीची घोषणा कन्झ्यूमर अप्लायन्सेसची जागतिक उत्पादक व्हर्लपूल कॉर्पोरेशन यूएसए या कंपनीच्या व्हर्लपूल ऑफ इंडिया या उपकंपनीने त्यांच्या पुण्यातील उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करीत असल्याची घोषणा नुकतीच केली. टप्प्याटप्प्यात ३५७ कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात येत असल्याचे मुंबईत झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ या परिषदेत व्हर्लपूल ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आले. यातून व्हर्लपूल कंपनीच्या `मेक इन इंडिया` आणि `मेक इन महाराष्ट्र` उपक्रमाप्रति असलेल्या निष्ठेचेच प्रतिबिंब दिसते. सदर घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि व्हर्लपूल इंडिया यांच्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ परिषदेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. १९९८ साली व्हर्लपूल इंडियाने पुण्याजवळीत रांजणगाव एमआयडीसी भागात अत्याधुनिक उत्पादन केंद्राची स्थापना केली. येत्या पाच वर्षांत रांजणगाव उत्पादन केंद्राच्या दुसऱ्या टप्...

'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे.

Image
'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे. ‘होणार सून मी ह्या घरची’या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली आणि ‘आदर्श सून’ ठरलेली तेजश्री प्रधान सध्या आर.जे. बनली आहे.  झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित  ' असेही एकदा व्हावे '  या आगामी  सिनेमात ती रेडियो जॉकीच्या भूमिकेतून तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच उमेश कामत आणि तेजश्री प्रधान हि जोडगोळी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत.  येत्या ६  एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील भूमिकेसाठी तेजश्रीने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते.  'असेही एकदा व्हावे' या सिनेमाचे शुटींग सुरु होण्यापूर्वी तेजश्रीने आपल्या व्यक्तिरेखेवर कसून अभ्यास केला होता. त्यासाठी तिने  आर. जे.चे खास एक महिना  वर्कशॉप प्रशिक्षण घेतले होते.  रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद,  लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा  हजरजबाबीपणा,  तसेच विषय खेळवत ठेवण्याची किमया, आणि गाण्यांद्वारे केले जाणारे श्रोत्या...

१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन'सिनेमाचे निर्माते

Image
१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन'सिनेमाचे निर्माते कोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच! माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' हि म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन'सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला. मनोहर मुंगी आणि जोशी काका अश्या या दोन प्रेक्षकांनी दिलेली हि शंभरची नोट बबन सिनेमाच्या निर्मिती मार्गावर खारीचा वाटा ठरली. आपल्या सिनेमाला मिळालेल्या या पहिल्या मदतनीसांचा दिग्दर्शक भाऊराव क-हाडे 'बबन...

पर्ल ऍकॅडमी तर्फे पी जी अभ्यासक्रमासाठी 'ओपन हाऊस' चे आयोजन

पर्ल ऍकॅडमी तर्फे पी जी अभ्यासक्रमासाठी  ' ओपन हाऊस '  चे आयोजन •               मीडिया आणि बिझनेस डोमेन उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे चर्चासत्र •               ४०० हुन अधिक विद्यार्थी उपस्थित •               संस्थेकडून २४ फेब्रुवारी २०१८ ला गुणवत्ता शिष्यवृत्ती चाचणी भारतातील डिजाईन ,  फॅशन आणि बिजनेस आणि मीडिया क्षेत्रातील आघाडीची संस्था पर्ल एकेडमीने मुंबईतील कॅम्पस मध्ये    विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील करिअर आणि संधी यासाठी  ' ओपन हाऊस '  सेशन चे आयोजन केले होते. पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात पॅनल चर्चेसाठी दैनिक भास्कर समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ भास्कर दास ,  अभिनेत्री मोनिका मूर्ती ,  व्हिजन वर्ल्डचे हेड स्ट्रॅटेजी अॅँड मार्केट डेव्हलपमेंट अमिताश बॅनर्जी ,  लक्झरी उद्योग तज्ज्ञ कलीम खान ,  पर्ल ...

इमाराचा नवा चेहरा जॅकलिन फर्नांडिस

Image
इमाराचा नवा चेहरा जॅकलिन फर्नांडिस जलद गतीने विस्तारत असलेल्या फॅशन रिटेल कंपनीने, इमारा चा स्प्रिंग 2018साठी नवा चेहरा लोकप्रिय बॉलिवुड नटी जॅकलिन फर्नांडिस असेल, असे जाहीर केले आहे. इमारा ही स्त्रियांच्या एथनिक वेशभूषेची सेलिब्रिटी फॅशन लाइन आहे, याची संकल्पना यूएसपीआलद्वारे करण्यात आलेली आहे, यातील एथनिक डिझाइन्स समकालीन इटरप्रिटेशनची आहेत. जॅकलिनचे व्यक्तिमत्त्व अत्याधुनिक भारतीय तरुण मुलीच्या चार्मिंग व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहे, ती कूल आहेच शिवाय तिची स्टाइलही तशी आहे ; इमारा ब्रँडची सर्व वैशिष्ट्ये यात येतात. सर्वात जास्त यश प्राप्त केलेली ही नटी व उद्योजिका तिच्या ट्रेंड सेटिंग फॅशनसाठी प्रसिद्ध आहे, फॅशनबद्दल जागरुक असणाऱ्या शहरी तरुणींचेच ती प्रतिनिधित्व करते. या नव्या विकासाविषयी, यूएसपीएलचे संस्थापक आणि सीईओ अंजना रेड्डी म्हणाल्या की, `` जॅकलिनची इमारासहची संलग्नितता कंपनीच्या धोरणात्मक वचनबद्धतेत प्रतिवबिंबित होते, महिलांच्या एथनिक वेशभूषेचा विस्तार करते. आमची विस्ताराची धोरणे इमाराच्या श्रेयानुसार येतात, याद्वारे स्टाइलिश क्लासिक समकालीन फॅशन सादर केली जाते. ...

२३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

२३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव! ४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर   जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्यारसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, आणि कलेची देवाणघेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात रंगणार आहे. २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ४० हून अधिक देशांतील हजारो कलावंत सहभागी होणार आहेत.   अत्युत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय ४०हून अधिक लाइव्ह कला प्रकार सादर केले जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी...