डॉ. बत्रा’s® यांच्या १७ व्या पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्स २०२५ मध्ये प्रेरणादायी संघर्षकथांना सलाम
डॉ. बत्रा’s® यांच्या १७ व्या पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्स २०२५ मध्ये प्रेरणादायी संघर्षकथांना सलाम
मनीषा कोईराला यांनी पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड प्राप्तकर्त्यांच्या दृढतेला आणि जिद्दीचा गौरव केला
बजाज ऑटो लिमिटेडच्या सहाय्याने आयोजित
डॉ. बत्रा’s® पॉझिटिव्ह हेल्थ
अवॉर्ड्सच्या १७ व्या आवृत्तीमध्ये आजारपण,
दिव्यांगत्व आणि प्रतिकूल परिस्थितींवर मात करून समाजावर
दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या विलक्षण व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतः कर्करोगावर
मात केलेल्या मनीषा कोईराला यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रत्येकी एक लाख
रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले.
मुंबईतील प्रतिष्ठित टाटा थिएटर, एनसीपीए येथे आयोजित या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. अक्षय बत्रा (उपाध्यक्ष आणि एमडी – डॉ. बत्रा’s® हेल्थकेअर) आणि अभिनेत्री मन्दिरा बेदी
यांनी केले.
या वर्षी, कार्यक्रमाला विविध
क्षेत्रे आणि प्रदेशांमधून आलेल्या १,००० हून अधिक प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल उपस्थिती दिली. पाच पुरस्कार
विजेते — तिनकेश कौशिक (तीन अवयव गमावूनही माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचले), अमला पंकज (पाठीच्या दुखापतीनंतरही सोशल मीडिया
इन्फ्लुएंसर), राजिंदर कुमार (पॅरा-ऑलिम्पिक
सुवर्णपदक विजेता), एस. रामन (मस्क्युलर
डिस्ट्रॉफी रुग्ण – अमर सेवा संघमचे सचिव) आणि जनतेच्या पसंतीचा पुरस्कार विजेता कृष्णकुमार
समनिया (पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता) यांना त्यांच्या अद्भुत धैर्य आणि जीवन बदलणाऱ्या
आव्हानांसमोर दाखवलेल्या अढळ निर्धारासाठी गौरवण्यात आले.
नामांकनांची निवड एका प्रतिष्ठित परीक्षक मंडळाने केली, ज्यामध्ये राजीव बजाज (व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो लिमिटेड), पद्मश्री डॉ. मुकेश बात्रा (संस्थापक अध्यक्ष, डॉ. बात्रा’s®), श्रीमती मेनका संजय गांधी (माजी केंद्रीय मंत्री), अभिनेते विवेक ओबेरॉय आणि चित्रपट दिग्दर्शक आर.
बाल्की यांचा समावेश होता.
संध्याकाळी एक प्रभावी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला, ज्यामध्ये दृष्टिहीन कलाकारांचे ऑर्केस्ट्रा सादरीकरण, व्हीलचेअरवर केलेला नृत्यप्रयोग आणि इतर कलात्मक
सादरीकरणांचा समावेश होता. समावेशन, सन्मान आणि
सकारात्मक आरोग्याच्या खऱ्या भावनांचे प्रतीक ठरणारी इतर कलात्मक सादरीकरणे देखील साजरी करण्यात आली.
या प्रसंगी पद्मश्री डॉ. मुकेश बात्रा, संस्थापक अध्यक्ष – डॉ. बात्रा’s® यांनी सांगितले:“एखाद्या पीडित रुग्णाला आत्मविश्वास
देणारा सर्वोत्तम व्यक्ती नेहमी डॉक्टर नसतो,
तर तो रुग्ण असतो ज्याने स्वतः आजारावर मात केली आहे. हे विशेष सक्षम योद्धे
केवळ आपल्या आजारांवर धैर्याने विजय मिळवून थांबले नाहीत, तर समाजासाठी योगदान देण्याचा अर्थच नव्याने परिभाषित
केला आहे. ते आपल्याला आठवण करून देतात की मोठ्या संकटांच्या काळातही आपण उभे राहू
शकतो. ते दाखवतात की ताकद म्हणजे संकटांचा अभाव नव्हे,
तर त्यावर मिळवलेला विजय आहे.”
बजाज ऑटो लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजीव बजाज म्हणाले: “मी होमिओपॅथीचा दृढ विश्वास ठेवणारा आहे आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्याविषयीच्या गरजांसाठी मी नेहमीच डॉ. बत्रा यांच्यावर अवलंबून राहिलो आहे. आम्ही नेहमीच विश्वास आणि उद्देश यांच्या उपचारक्षमतेवर विश्वास ठेवला आहे. हे पुरस्कार त्या व्यक्तींना सन्मानित करतात ज्यांनी केवळ प्रचंड आव्हानांवर मात केली नाही, तर या प्रवासात हजारो लोकांना प्रेरित केले आहे. अनेक वर्षांपासून या अर्थपूर्ण उपक्रमाला पाठिंबा देणे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.”
प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती मनीषा कोईराला यांनी सांगितले: “मी डॉ. बात्रा’s® फाउंडेशनचे
अभिनंदन करते की त्यांनी हे पुरस्कार सुरू केले. स्वतः कॅन्सरवर मात केलेली व्यक्ती म्हणून मी त्या वेदना आणि संघर्षाचा अनुभव घेतला आहे ज्यातून रुग्ण जातो आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी किती ताकद लागते. येथे उभे राहून या कथा उलगडताना पाहणे अत्यंत विनम्र अनुभव आहे त्यांचे निर्भयपण केवळ प्रेरणा देत नाही तर आपण शक्य मानतो त्या मर्यादांचाही विस्तार
करते.त्यांचा गौरव करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे आणि मी प्रार्थना करते की त्यांच्या प्रवासाने असंख्य जीवनांना स्पर्श करत राहावे.”
डॉ. बु अब्दुल्ला, चेअरमन – बु अब्दुल्ला ग्रुप ऑफ कंपनिज, जे या विशेष प्रसंगासाठी
खास दुबईहून आले होते, ते म्हणाले: “हा कार्यक्रम माझ्या मनाला स्पर्शून गेला. मला आनंद आहे की मी डॉ. बत्रा यांना पुढील वर्षी हा कार्यक्रम दुबईमध्ये आयोजित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.”
पुरस्कारांपलीकडेही, डॉ. बात्रा’s® काळजी आणि समावेशकतेची संस्कृती वाढविण्याच्या आपल्या दीर्घकालीन बांधिलकीला पुढे नेत आहेत. सुलभ आरोग्यसेवा, समाजाशी सातत्यपूर्ण संपर्क आणि कठीण परिस्थितींना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना आधार देणारे कार्यक्रम हे या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत. संस्था समावेशक आरोग्यसेवा उपक्रम, सातत्यपूर्ण
जनसंपर्क उपक्रम आणि वर्षभर मिळणाऱ्या सहाय्याद्वारे आपला सामाजिक प्रभाव अधिक
बळकट करत आहे, जेणेकरून लोकांना आपले जीवन पुन्हा उभारण्यासाठी
आवश्यक ते समर्थन व सन्मान मिळू शकेल.

Comments
Post a Comment