‘सामना’ चित्रपटात आजही प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याची ताकद
‘सामना’ चित्रपटात आजही प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याची ताकद : आशिष शेलार सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शनाला रसिकांचा उदंड प्रतिसाद दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘सामना’ चित्रपटातील आशय तब्बल पाच दशकांनंतरही प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि तो पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत खेचून आणतो, हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या अभिजात कलाकृतीचे महत्त्व विशद केले. ‘सामना’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यावर ‘दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळा’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार, आशयघन आणि कालातीत चित्रपट नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न सार्थ ठरत सल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’तर्फे...