मोतीलाल ओसवाल फाउंडेशनचा पालघर जिल्हा परिषदेशी तीन वर्षांचा सामंजस्य करार
मोतीलाल ओसवाल फाउंडेशनचा पालघर जिल्हा परिषदेशी तीन वर्षांचा सामंजस्य करार ‘पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तन कार्यक्रम’ सुरू मोतीलाल ओसवाल फाउंडेशनने पालघर जिल्हा परिषदेसोबत (झेडपी) तीन वर्षांचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत ‘पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तन कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार म्हणजे जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या, शासनाच्या नेतृत्वाखालील उपक्रमाची सुरुवात आहे. ‘क्रेडल टू करिअर’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे. बालपणापासून ते युवकांच्या रोजगारक्षमतेपर्यंत पालघरमधील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, निपुण भारत आणि निपुण महाराष्ट्र यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीमधील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ९८ हजारांहून अधिक अंगणवाडीतील बालके आणि २ हजार युवकांचाही या कार्यक्रमात समावेश असेल. पालघर जिल्ह्यातील २,११५ शासकीय शाळा, २२ खासगी अनुदानित शाळा आणि १,६३४ अंगणवाडी क...