महाराष्ट्र पेक्सपोच्या वाढीचे प्रमुख इंजिन; पश्चिम विभागाचा एकूण व्यवसायात सुमारे ३० टक्के वाटा

 महाराष्ट्र पेक्सपोच्या वाढीचे प्रमुख इंजिन; पश्चिम विभागाचा एकूण व्यवसायात सुमारे ३० टक्के वाटा

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २५० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट


महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मजबूत व विस्तारित वितरण आणि किरकोळ विक्री जाळे; दीर्घकालीन वितरक भागीदारीचा भक्कम आधार

नवीन उत्पादने सादर करण्यासाठी महाराष्ट्र हा प्राथमिक मंच; जलद बाजारस्वीकृती आणि व्यापाराधारित विस्ताराला चालना

विक्री वाढ, पुनःखरेदी आणि प्रीमियम उत्पादनांच्या स्वीकारात पश्चिम विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान


मुंबई, १८ डिसेंबर २०२५: शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेल्या मजबूत व विस्तारित वितरण जाळ्यामुळे पश्चिम विभाग पेक्सपोच्या महसूलवाढीचा, नवीन उत्पादनांच्या लाँचचा आणि व्यापाराधारित विस्ताराचा प्रमुख चालक म्हणून उदयास आला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खोलवर रुजलेली उपस्थिती तसेच वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांशी असलेली दीर्घकालीन भागीदारी यामुळे ब्रँडची दृश्यमानता वाढण्यास मदत झाली आहे. ‘मेड-इन-इंडिया’ इन्सुलेटेड स्टील बाटल्यांच्या स्वीकाराला गती देण्यात या विभागाची भूमिका निर्णायक ठरली आहे.

राज्यातील पेक्सपोची सातत्यपूर्ण कामगिरी ग्राहकांचा दृढ विश्वास, सक्षम किरकोळ विक्री जाळे आणि व्यापार भागीदारांशी असलेला सलग संवाद अधोरेखित करते. परिणामी, महाराष्ट्र हे कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या वाढीच्या केंद्रांपैकी एक म्हणून स्थापित झाले आहे.

पेक्सपोने गेल्या सहा वर्षांत महसुलात दहा पटीने वाढ नोंदवली असून, २०२० मध्ये सुमारे २० कोटी रुपयांवर असलेला महसूल २०२४ मध्ये १८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२५ अखेरीस २५० कोटी रुपयांचा महसुली टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

नावीन्यपूर्णतेतील सातत्यपूर्ण गुंतवणूक, उत्पादनातील उत्कृष्टता आणि प्लास्टिकवरील अवलंबित्व कमी करण्याच्या कंपनीच्या ध्येयामुळे ही वाढ शक्य झाली आहे.

“आमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे पेक्सपोचे संचालक वेदांत पाडिया यांनी सांगितले. “लहान सुरुवात आणि मोठा दृष्टिकोन या बळावर आम्ही सहा वर्षांत महसुलात दहा पटीने वाढ साधली. हे आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या टीमच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. महाराष्ट्रासारख्या बाजारपेठांनी या वाढीत केंद्रस्थानी भूमिका बजावली असून, जलद विस्तार, नवीन उत्पादने आणि मजबूत व्यापार परिसंस्था उभारण्यास आम्हाला मोठी मदत झाली आहे.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet