राकोल्ड प्रतिष्ठित 'बीईई' पुरस्काराने सन्मानित

 राकोल्ड प्रतिष्ठित 'बीईई' पुरस्काराने सन्मानित

ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर विभागात राकोल्डला सलग दहाव्यादा सन्मानित केले

मुंबई, १९ जानेवारी २०२१: वॉटर हीटिंग उत्पादनांची भारतातील सर्वात मोठी कंपनी राकोल्डने 'मोस्ट एनर्जी एफिशियंट अप्लायन्स ऑफ द इयर २०२०' ('२०२० मधील सर्वाधिक ऊर्जा सक्षम उपकरण') बीईई पुरस्कार जिंकून आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.  राकोल्डला हा पुरस्कार इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर विभागात देण्यात आला आहे.  हा पुरस्कार जिंकून राकोल्डने आपल्या उद्योगक्षेत्रात ऊर्जा सक्षमतेच्या मानकांच्या बाबतीत नवा मापदंड रचला आहे.  बीईई पुरस्कार दहाव्यांदा जिंकणारा राकोल्ड हा या विभागातील एकमेव ब्रँड आहे.

ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या शानदार पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय ऊर्जा आणि नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री व कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्री श्री. आर. के. सिंग यांच्या हस्ते ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी पुरस्कार ऍरिस्टोन थर्मो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व संशोधन व विकास प्रमुख यांना प्रदान करण्यात आला.  या कंपनीने सुरुवातीपासूनच ऊर्जा सक्षमता हे आपले शाश्वत प्रगतीचे धोरण म्हणून स्वीकारले असून ऊर्जा संवर्धन ही आपली वचनबद्धता मानली आहे.

ऍरिस्टोन थर्मो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री मोहित नरूला यांनी सांगितले, " राकोल्डच्या सुरुवातीपासूनच आम्ही शुद्ध आणि शाश्वत पृथ्वीसाठी प्रयत्नशील राहणे हे आमचे उद्धिष्ट मानत आलो आहोत.  आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि स्टायलिश उत्पादने बनवत असताना ऊर्जा संवर्धन आणि सक्षमता यावर आमचा सर्वाधिक भर असतो. राकोल्डला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला ही आम्हां सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. ऊर्जा संवर्धन आणि शाश्वतता यांच्याबद्दल आमची वचनबद्धता या पुरस्कारातून दर्शवली जाते."     

राकोल्डच्या २५ लिटर क्षमतेचा इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर म्हणजे डिझाईन, स्टाईल आणि ऊर्जा सक्षमता यांचा मिलाप आहे.  यामध्ये पर्यावरणस्नेही "झीरो ओडीपी' थर्मल इन्स्युलेशन आणि चकाकणारी एबीएस आऊटर बॉडी आहे जी उष्णता वाया जाण्यापासून रोखते, व आपल्या ५ स्टार ऊर्जा रेटींगचे पालन करते.  याबरोबरीनेच टायटॅनियम प्लस कोटेड इनर टॅंक यासारखी वैशिष्ट्ये गंजण्यापासून अधिक चांगले संरक्षण देतात तसेच दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता प्रदान करतात.  स्मार्ट मिक्समुळे अतिरिक्त गरम पाणी मिळवण्यातही ग्राहकांची मदत होते. आपल्या ग्राहकांसाठी शाश्वत, पर्यावरणस्नेही उत्पादने तयार करण्यासाठी या कंपनीने स्वतःला वाहून घेतले असून भारताला हवामान प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या वाटचालीत एक पाऊल पुढे आणण्यात कंपनी मोलाचे योगदान देत आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202